Friday, February 27, 2009

स्वातंत्र्य

पक्ष्यांच्या किलबिलाटाचा, खळाळणाऱ्या पाण्याचा, बाळाच्या बोबड्या बोलाचा किंवा सुंदरीच्या पायातील नाजुक पैजणांपेक्षाही जगातील सर्वात मधुर आणि मंजूळ आवाज कुणाच्या तरी पायातील साखळ्या सुटण्याचा.... स्वातंत्र्याचा अर्थ तोच समजू शकतो जो पारतंत्र्यात राहीला आहे पण स्वतंत्रतून पारतंत्र्यात जावू पाहणाऱ्याबद्दल काय म्हणाल.... मंडळी जगातील सर्वात तरुणांची जास्त संख्या असलेल्या भारताला याबद्दल स्वतःचे कौतुक करायला हवे कि चिंता.... सध्याची परिस्थीती बघीतली तर चिंतेचे कारण बळावत चालल्याचे दिसत आहे. भारतातील तरुण आता तिशीतच साठीचे वाटू लागले आहेत. अनेक कारणांनी हे तरुण स्वतःचे स्वातंत्र्य गमावून अनेक विकारांचे गुलाम बनत आहेत. ऐन तारुण्यात ताणाचे गुलाम बनून वृद्धत्वाला जवळ करत आहेत. आणि त्यापासून लपण्यासाठी औषधांचे गुलाम बनत आहेत.
तिशीत उत्साहासाठी, नैसर्गीक क्षमता टिकण्यिासाठी तरुणांना औषधांचा आधार घ्यावा लागतो आहे ही बाब अगदीच क्‍लेषदायक आहे. ताण तणावांच्या आणि औषधांच्या बेड्या या तरुणांच्या पायातून ज्या दिवशी निखळून पडतील तेव्हाच स्वातंत्र्याचा सूर्य उत्साहाचे अर्ग्य स्वीकारेल..........

No comments: