Friday, February 27, 2009

प्रवास उलट दिशेने

देवानं आपल्याला दिलेलं सुंदर वदरान म्हणजे आपलं जीवन. जीव आहे म्हणून या पृथ्वीचं सौदर्य आहे. सौंदर्य सजिवतेत असतं म्हणूनच आपण शिल्प असो वा चित्र किंवा एखादी कथा, कविता त्यात जिवंतपणा शोधतो आणि त्यातला जिवंतपणा आपल्याला दिसला नाही तर आपण त्याला कुरूपतेचे मापदंड लावतो. सौदर्य आणि सजिवतेचं अतुट नातं असतं. सजिव निर्जिव बनला की त्याचं सौदर्य लोप पावतं. त्याला कुरूपतेचा शाप मिळतो. पण सजिवाकडून निर्जीवाकडे जाणारा प्रवास एका संथ गतीत आणि निसर्गाच्या दिशेने जाणारा असेल तर पहिल्या जागी दुसरा सजिव जागा घेतो आणि तेथील सौदर्य अबाधित राहतं. पण हा प्रवास उलट दिशेने होत असेल तर......
गेल्या काही वर्षांतील निष्कर्ष तरी असेच निघू लागले आहेत. भौतिक सुखाच्या अतिरेकी लालसेपोटी छाती फुटेपर्यंत धावायचं आणि जर तरीही हाती काहीच गवसलं नाही तर छाती फोडून घ्यायची हा निसर्गाच्या नियमांना छेद देणारा नियम होवू लागला आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात आत्महत्त्येचे प्रमाण कमालीचे वाढू लागले आहे. आत्महत्येत महाराष्ट्र भारतात तिसऱ्या क्रमांकावरील राज्य बनले आहे. दूर तिकडे परदेशात म्हणता म्हणता हा आत्महत्येचा अजगर आता महाराष्ट्राच्या पोटावर बसून विक्राळ दात दाखवत आहे.
कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, परीक्षेत अपयश आले म्हणून विद्यार्थ्यांची आत्महत्या, प्रेमात अपयश आले म्हणून तरूण तरुणींची आत्महत्या, बाह्य जगातील सुखे पदरात पडत नाहीत म्हणून निराशेने गृहीणींची आत्महत्या अशा असंख्य कारणांनी आत्महत्या होत आहेत. अगदी आई बोलली, बाबा रागावले अशा कारणांनी ज्या आत्महत्या होत आहेत त्याकडे बघीतलं की माणसांच्या जाणिवा इतक्‍या संवेदनशील बनल्याचं हे द्योतक मानायचं कि माणूस वरवर जरी प्रगतीची शिखरं गाठत असला तरी अंतर्गरित्या कोलमडत आहे आणि त्यातून त्याला सावरणारं आत्मिक बळ आता त्याच्यापासून दूर जावू लागलं आहे असं माणायचं काहीच कळत नाही. महाराष्ट्रात तरी या अजगराला रोखायला हवं ..........

1 comment:

prajkta said...

apeksha kupach aahet. pan ashawadhi jaruri aahe. keep it up